नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अगामी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ७३ जिल्हा परिषद गटांची आरक्षण प्रक्रियचे सोडत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी,अनुराधा ढालकरी यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या कै.डॉ.शंकरराव चव्हाण सभागृहात गुरूवारी दि.२८ जुलै रोजी काढण्यात आली या सोडतीचा ङ्गटका अनेक दिग्गजांना बसला असल्याचे पहावयास मिळाले ७३ पैकी ३७ जिल्हा परिषदेचे गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.त्यात अनुसुचित जातींच्या महिलांसाठी ७,अ जमाती महिला ४,नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला ८,सर्वसाधारण महिला १८ असे गट राखीव ठेवण्यात आले आहेत.
नांदेड जिल्हा परिषदेच्या आगामी काळात होऊ घातलेल्या ७३ गटांसाठीच्या आरक्षण प्रक्रिया गुरूवार दि.२८ जुलै रोजी नियोजन भवन येथील डॉ.शंकरराव चव्हाण सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या उपस्थितीत खचाखच भरलेल्या सभागृहात पार पडली.सुरूवातीला चक्रानुक्रम पध्दतीने मागील पाच निवडणूकीचे आरक्षणानुसार ही सोडत काढण्यात आली.सूरूवातीला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जिल्ह्यातील गौळ,वडेपूरी,सोनखेड,कलंबर(बु),सावरगांव (न),बहाद्दरपूरा,गोकुंदा,भोसी,दुधड,इस्लापूर,मोहपूर,बोधडी,पिंपळढव,वाई ही गट आरक्षित करण्यात आली त्यातून इश्वरी चिठ्ठीव्दारे मल्टीपर्पज हायस्कुलच्या ५ व्या वर्गात शिकणार्या धनश्री दत्ता हुसूकवार व प्रिया हिरामन धोंगडे या चिमुकल्यांनी महिलांसाठी वडेपूरी,गौळ,गोकुंदा,पिंपळढव,मोहपूर,भोसी,बहाद्दरपूरा हे ७ गट चिठ्ठी काढून अनुसूचीत जातीच्या महिलांसाठी आरक्षीत झाले.अनुसूचीत जमातीसाठी ७ गट आरक्षीत करण्यात आले त्यात लखमापूर,लहान,तळेगांव,आरळी,सावरगांव(पि.),देगाव,करखेड यातील ४ गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले त्यात सावरगांव(पि.),आरळी,करडखेड,लहाण या गटांचा समावेश आहे.नागरीकांचा मागसप्रवर्गसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात २०.३ टक्के आरक्षण देत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले त्यात १५ गट नागरीकांच्या मागास प्रवर्गसाठी आरक्षीत केले.यात मनाठा,धनेगांव,बरबडा,आष्टी,मालेगांव,वाजेगांव,रामतीर्थ,कुंटूर,मांजरम,उमरा,माळाकोळी,शिराढोण,एकलारा,मुक्रमाबाद,जांब (बु) यांचा समावेश होता यातील ८ गट महिलांसाठी आरक्षीत करण्यात आले त्यात वाजेगांव,मुक्रामाबाद,शिराढोण,धनेगांव,मनाठा,बरबडा,उमरा,एकलारा हे महिलांसाठी इश्वरी चिठ्ठीव्दारे आरक्षीत करण्यात आले. सर्वसाधारण प्रवर्गातील३७ गटापैकी १८ गटांवर महिलांसाठीचे आरक्षण काढण्यात आले.यात सिरंजणी,सरसम(बु),निवघा(बा),रूई,पाळज,करखेली,येताळा,लोहगांव,ङ्गुलवळ,कुरूळा,येवती,मरखेल,हानेगांव,कोळी,नरसी,दापका(गुं),गोरठा,पेठवडज हे १८ गट सर्वसाधारण महिलांसाठीआरक्षीतकरण्यात आले.तरउर्वरित१९ गट पळसा,वानोळा,सारखणी,मांडवी,जलधारा,तामसा,येळेगांव,वाडी(बु),लिंबगाव,बळीरामपूर,बारड,मुगट,माळकौठा,सगरोळी,कौठा,चांडोळा,बार्हाळी,खानापूर,शहापूर हे सर्वसाधारण साठी सुटल्याने अनेक इच्छुकांनी सुटकेचा निश्वा:स सोडला आहे.