अग्निशमक दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात
बिलोली(प्रतिनिधी)-येथील कांही अंशी मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद हायस्कुलला रविवार दुपारी दीडच्या सुमारास भीषण आग लागली आगीने आपले रौद्ररूप धारण करीत असतांना अगदी वेळेवर येथील नगरपरिषदेचे अग्नीशमक दलाचे वाहन घटना स्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे मोठी हानी टळली आहे.
सध्या शाळेला दिपावलीच्या सुट्या असल्यामुळे आगीत नेमके काय नुकसान झाले याची माहीती मिळू शकली नसली तरी आगीत शाळेचे रेकार्ड जळाल्याची माहीती समोर येत आहे.नगरपरिषदेच्या अग्नीशमक दलाच्या गाडीला तात्काळ पाचारण करण्यात आले असता तब्बल दोन तासा नंतर आग आटोक्यात आली आहे.तर नेमकी आग कशामुळे लागली हे समजु शकले नाही.आग शॉंर्टसर्कीटमुळे म्हणावे तर एक रुम सोडले तर संपुर्ण शाळेत विज पुरवठा नाही याचा अर्थ कोणीतरी खोडसाळ पणाने ही आग लावल्याची चर्चा हायस्कुल परिसरात होती.येथील नगर परिषदेच्या अग्नीशमक दलाची गाडी येवुन पुर्णपणे आग आटोक्यात आणली यावेळी येथील पोलीसांचेही सहकार्य मिळाले.
