
नांदेड,(प्रतिनिधी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारा पुरस्कृत विकासार्थ विद्यार्थी ह्या आयामा अंतर्गत माघ शुध्द दशमी ह्या दिवशी गोदावरी नदीचा अवतरण दिन साजरा करण्यात आला हा उपक्रम अभाविप २०१७ पासुन राबवत आहे. याचा प्रसार व प्रचार जनमानसात व युवा पिढी पर्यत पोहचावा व नदी हि आपली जीवनदायीनी असुन तिचे संरक्षण व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. हा त्या मागील उद्देश आहे.
गोदावरी अवतरण दिनाच्या पुर्व संध्येला प्रमुख मान्यवर म्हणुन गंगाविचार मंच चे राष्ट्रिय संयोजक भरत पाठक हे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी नही रूकेंगे,स्वच्छ करेंगे असा नारा देते नमामी गंगे प्रमाणे सर्व नद्यांचे अस्तित्व अबाधित राखणे व त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले.
ह्या वेळी नमामी गंगे ह्या उपक्रमात गोदावरी नदीचा हि समावेश करावा असे निवेदन भरत पाठक ह्यांना समस्त नांदेड वासीयांच्यावतीने देण्यात आले. ह्यावेळी कार्यक्रमाचा मुळ उद्देशाला अनुरूप असे संरक्षण व संवर्धन हा विचार कृतीशीलतेतुन मनामनात रूजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार सर्व माता भगिनीच्या हस्ते गौमय दीप दान करण्यात आले. ओटीचे सामान गोदावरी नदीत अर्पण न करता ते प्रतिकात्मक स्वरूपात प्रतिमे पुढे करुन सर्वानी ओटी भरली ,ओटीतील ही सामग्री गरजू लोकांना देण्यात येणार आहे . तर ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विकासार्थ विद्यार्थी (SFD) राष्ट्रीय सहसंयोजक मयुर जव्हेरी हे उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे सुञसंचलन सौ. योजना कौलवार ह्यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सनतकुमार महाजन , गणेश बोडके , सर्वेश पिंपराळे , श्रीराज चक्रावार ,अंकिता कामतीकर ,सतीश भोळे , शुभम मोहरे , राजु नरवाडे , वैष्णव मोतीवाड , मोहन मोरे , यांनी परिश्रम घेतले.
