नांदेड, (प्रतिनिधी)- किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Related Posts
तामसा येथे घरफोडून 3 लाख 92 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-तामसा ता.हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 92 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील सुंदरनगर भागामध्ये 25 हजार रुपये…
विद्यार्थ्यामधील नवसंकल्पना ना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजची सुरूवात
नांदेड (जिमाका)- विद्यार्थ्याच्या नवसंकल्पना ना चालना देण्यासाठी व नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन…
विष्णुपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला ;471 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग
नांदेड(प्रतिनिधी)-यंदाचा पावसाळा सुरू झाल्याबरोबर एका आठवड्यात विष्णुपूरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार विष्णुपूरी धरणातील एक दरवाजा…