नांदेड, (प्रतिनिधी)- किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Related Posts
शाळा बांधकामासाठी शेष निधी उपलब्ध करुन द्यावा; सीईओच्या दालनासमोरच आमरण उपोषण
नांदेड(प्रतिनिधी)- कंधार तालुक्यातील पेठवडज येथील गावात शाळेला इमारत बांधकामासाठी शेष निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी पेठवडज येथील नागरिकांनी आज…
खून केलेले तीन आरोपी देगलूर पोलीसांनी काही तासातच पकडले ; पाच दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीचा खून करून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या मारेकऱ्यांना देगलूर पोलीसांनी काही तासातच गजाआड केले. देगलूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने…
लोहयात छत्रपती शिवाजी महारांजांची प्रतीमा वादात अडकली; पूर्णाकृती अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा लोहा पालिकेच्या ताब्यात !
लोहा,(प्रतिनिधी)-लोहा शहरात नववर्षाच्या प्रथम दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा स्थापन करण्याच्या प्रक्रियेला अडकाठी आणली. पुन्हा एकवार श्रेयवादाचा संघर्ष…