नांदेड, (प्रतिनिधी)- किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Related Posts
ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर येथील उपसरपंच आणि एक ग्रामपंचायत सदस्य जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले
नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत वाडी नियमतुल्लापुर ता.मुदखेड येथील उपसरपंच आणि एका ग्राम पंचायत सदस्याला गायरान जमीनीवर अतिक्रमण केले म्हणून त्यांना पुढील कालावधीसाठी…
गोळीबाराचा कट रचणाऱ्या सविता गायकवाड पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्यावरच गोळीबाराचे कुंभांड (कट)रचवणाऱ्या महिलेला प्रथमवर्ग वर्ग न्यायदंडाधिकारी सी.एस.जाधव यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.9 जानेवारी रोजी नांदेड…
अशोकरावांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या शेतकऱ्यांच्या वेदना अन् अपेक्षा
*अतिवृष्टीच्या नुकसानाबाबत विस्तृत चर्चा; प्रशासनाचे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन* नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त देगलूर, बिलोली, मुखेड, भोकर, मुदखेड, अर्धापूर आदी तालुक्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर…