नांदेड (प्रतिनिधी)-स्वाधार योजनेसह विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 21 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुले, शाहु, आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिरी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्ती सन 2020 ते 2023 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनतील रक्कम अद्यापही विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यातवर जमा झाली नाही. तसेच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे कागदपत्रे टि.सी, मार्कमेमो महाविद्यालयाकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाचे याक डे लक्ष वेधण्यासाठी फुले, शाहु, आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भारत सरकार शिष्यवृत्ती रक्कमेत महागाई भत्यानुसार वाढ करण्यात यावे, स्वाधार योजनेची तालुका स्तरावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावे, योजनेची 50 टक्केची जाचक अट रद्द करून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात यावी, भारत सरकार शिष्यवृत्ती हे शैक्षणिक वर्षे संपविण्यापूर्वी विद्यार्थ्यांची रक्कम करण्यात यावी, भारत सरकार शिष्यवृत्ती अभावी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रेसाठी अडवणूक केली जात आहे यावर आळा घालावा, भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजना व इतर शिष्यवृत्ती वजेट वाढविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
Related Posts
34 चोऱ्या करणारा नांदेड ग्रामीण पोलीसांनी आणला; तीन दिवस पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात 34 चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या एका चोरट्याला नांदेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नांदेड ग्रामीण येथील एका गुन्ह्यात 3 दिवस पोलीस…
पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून कोंडी : न्यायासाठी प्रा. राजू सोनसळे यांच्या नेतृत्वात उद्यापासून आंदोलन
नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागातून पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची कोंडी करण्याचे काम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडून…
50 लाखांच्या बॅग चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला पण चोर सध्या गुजराथ तुरुंगात
नांदेड(प्रतिनिधी)-15 डिसेंबर रोजी बाफना टी पॉईंट येथील एका हॉटेलसमोरून भोकरच्या मनजित कॉटन या कंपनीचे 50 लाख रुपये चोरीला गेले…