नांदेड, (प्रतिनिधी)- किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Related Posts
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 97 रुग्ण बरे होऊन परतले घरी
▪️रुग्णालयामध्ये 732 रुग्ण भरती ▪️622 रुग्णांवर उपचार ▪️59 रुग्णांवर शस्त्रक्रिया नांदेड, (जिमाका)- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व…
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणारा दुसरा आरोपी पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-मुदखेड तालुक्यातील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या नराधमाला काल अटक झाल्यानंतर आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 9 दिवस अर्थात…
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची बदली
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची बदली नागपूर येथें झाली असून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नागपूर या पदावर करण्यात आल्याचे…