नांदेड, (प्रतिनिधी)- किनवट परिसरात पैनगंगा नदीला पूर आला आहे. पुर्ण क्षमतेने नदी भरुन वाहत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीत येणारे पाण्याचे प्रमाण लक्षात घेता स्वाभाविकच पैनगंगेचे पाणी किनवटच्या नदी जवळील सखल भागात घुसले आहे. या भागातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले असून प्रशासनातर्फे या लोकांना अन्नाची पाकिटे व इतर व्यवस्था केली जात असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी दिली. आज सकाळ पासून नांदेड-किनवट हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झालेला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
Related Posts
पक्कीचाळ परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील उस्मानशाही मिलच्या फुटबॉल मैदानाजवळ एका 35 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सकाळी…
सहा महिन्यापुर्वीच्या मृत्यूप्रकरणी बिलोली पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर खूनाचा गुन्हा दाखल केला
नांदेड(प्रतिनिधी)-गंजगाव ता.बिलोली येथे 9 जून 2023 रोजी घडलेल्या मृत्यू प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर बिलोली पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दि.9…
आईला दुचाकीने धक्का दिला म्हणून बदल्यात युवकाचा खून
मयत अवधूत गिरडे नांदेड(प्रतिनिधी)-आज सायंकाळी 5.30…